शांत आणि शिस्तप्रिय उद्धव ठाकरे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठी वैचारिक परंपरा लाभली. घरातील चळवळीची आणि राजकारणाची पार्श्वभूमी असताना आपल्या कर्तृत्वाने शिवसेनेला वेगळी दिशा देण्याचे कार्य उद्धव ठाकरे यांनी केले. राजकारणासोबतच आपले छंद जोपासणारे उद्धव हे आगळेवेगळे व्यक्तिमत्व. त्यांच्या कर्तृत्वरुपी आयु्ष्याचा हा ओझरता प्रवास.....


उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असले तरी त्यांना राजकारणात कधीही रस नव्हता. फोटोग्राफी आणि लिखाण यामध्येच ते जास्तवेळ रमत असत. उद्धव यांची काढलेली छायाचित्र अनेक वृत्तपत्रं तसेच मासिकांमध्ये प्रकाशित होत असे. घरी राजकारणाची मोठी परंपरा असली तरी वयाच्या चाळीशी पर्यंत उद्धव यांनी शिवसेनेत फारसे लक्ष घातले नव्हते. त्यांची आवड आणि छंदात ते जास्त वेळ घालवत. मात्र 2002 सालच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून त्यांनी राजकारणात लक्ष घालायला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे यांनी खास त्यावेळी निवडणुकीत पक्षाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सोपवली. अनेक शिवसैनिकांनी त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना पक्षीय राजकारणात काम करताना प्रथमच पाहत होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिका निवडणुकीत शिवसेनेने चांगली कामगिरी बजावली. त्यामुळे उद्धव यांच्यातील राजकीय कौशल्य दिसून आले. त्यानंतर ते पक्षाच्या कामात अधिक रस घेऊ लागले. त्याचाच पुढील भाग म्हणून 2004 साली बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची उत्तराधिकारी म्हणून निवड करत शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष जबाबदारी दिली.



उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचे कार्याध्यक्षपद असले तरी पक्षाची धुरा बाळासाहेबांच्याच हाती होती. पुढे वृध्दत्वामुळे बाळासाहेब फारसे सक्रीय नसल्याने उद्धव अधिक सक्रीय झाले. 2013 साली बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेची धुरा उद्धव यांच्याकडेच आली. राजकारणात उध्दव तुलनेने उशिरा आले असले तरी त्यांनी राजकीय कौशल्ये फार कमी वेळात आत्मसात केली. त्याची प्रचिती 2002 च्या महापालिका निवडणुकीत दिसूनही आली. सुरुवातीला आक्रमक भूमिका असलेल्या शिवसेनेचे पक्षीय संघटन मजबूत करणे, पक्षाचे जाळे विणणे, पक्षाला शिस्त लावणे आदी बाबींवर त्यांनी भर दिला. राज्यातील इतर भागातही पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. 2007 साली त्यांनी विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. तसेच कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदत केली होती.



2012 च्या महापालिका निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेने विकासासाठी पुढाकार घेतला. पक्षाची आक्रमक भूमिका थोडीसी बाजूला ठेवत संयत आणि संतुलितपणे पुढे जाण्याचा पायंडा उद्धव यांनी पाडला. 2019 च्या विधनसभा निवडणुकीनंतर राज्याला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून लाभले. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासारखी आक्रमक भूमिका नसली तरी राज्याला शिस्तप्रिय, शांतप्रिय नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्यारुपात मिळाले आहे.



छंदात रमणारे उद्धव
उद्धव ठाकरे हे निसर्गप्रेमी आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. फोटोग्राफीमध्ये ते अधिक वेळ रमतात. हेलिकॉप्टरमधून राज्यातील किल्ले आणि निसर्गाचे काढलेले छायाचित्र बरेच लोकप्रिय झाले आहे. त्यांनी काढलेले निवडक छायाचित्र मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये लावली आहे. त्याशिवाय त्यांनी केलेल्या हवाई छायाचित्रणाचे दोन कॉफीटेबल पुस्तक प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्रीतील किल्ले, नद्या, मंदिरे, शहरं, निसर्गाचे अप्रतिम छायाचित्रांचे 'महाराष्ट्र देशा' 2010 साली, तर आषाढी वारीचे आळंदी व देहूपासून पंढरपूरपर्यंतचा प्रवास त्यांनी 'पहावा विठ्ठल' या कॉफीटेबल पुस्तकाच्या रुपाने सर्वांसमोर आणला.



प्राणीप्रेमी उद्धव
प्राण्यांविषयी उद्धव यांना खास प्रेम आणि आपुलकी आहे, याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. फावल्या वेळेत ते दूरचित्रवाणीवर डिस्कव्हरी आणि अॅनिमल प्लॅनेट वाहिन्यांवरील कार्यक्रम आवर्जुन पाहतात. एवढंच नव्हे तर 1995 ते 1999 साली शिवसेना आणि भाजपची सत्ता असताना उद्धव यांच्या पुढाकाराने वनरक्षकांना मदत करण्यासाठी एक योजना आखली होती. त्यांतर्गत ते स्वतः विविध जंगलात जाऊन वनरक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जोपासना ट्रस्टची स्थापना करून वनरक्षकांना रेनकोट, टॉर्च आणि गमबूटचे वाटप केले होते.
------
ऋषिराज तायडे, 9404141216

साहित्य संमेलनातील वाद व्हावे बाद...

साहित्य संमेलन आणि वाद यांचे जणू समीकरणच आहेसाहित्य संमेलनात वाद झाले नाही असे कधी ऐकिवात नाहीनुकत्याचउस्मानाबाद येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही त्याला अपवाद नव्हतेदरवर्षी साहित्य संमेलनात होणाऱ्या वादाकडे सर्वसामान्य साहित्यरसिक कसे बघतोत्याला साहित्य संमेलनातील घडामोडींबाबत काय वाटले
संमेनातील ग्रंथप्रदर्शनात फेरफटका मारल्यानंतर कोणकोणत्या पुस्तकांना मागणी होतीयाचा घेतलेला हा धांडोळा...

दरवर्षी आषाढीला पंढरपूरला वारकऱ्यांची मांदियाळी भरतेत्या प्रमाणे दरवर्षी साहित्यिकांची वारी संमेलनाच्या निमित्ताने जमत असतातनुकतेच उस्मानाबाद येथे 93 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हजारो साहित्यरसिकांचा मेळा जमला होताइतिहासात प्रथमच उस्मानाबाद येथे साहित्य संमेलन होत असल्याने आयोजकांनीही संमेलन यशस्वी पार पडण्यासाठी कंबर कसली होतीमात्रसाहित्य संमेलन आणि वाद होणार नाहीअसे काही होऊ शकत नाहीउस्मानाबादच्या साहित्य संमेलनही त्याला अपवाद नव्हतेफादर फ्रान्सिस दिब्रिटो याची सप्टेंबर महिन्यात संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यापासून यंदाच्या वादाला सुरुवात झालीसुरुवातीला खुद्द दिब्रिटो यांना काही संघटनांकडून धमकीचे पत्रफोन आले होतेतुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारू नकाअन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतीलअशा आशयाची धमकी त्यांना देण्यात आली होतीमात्रफादर यांनी त्याला भीक  घालता संमेलनाध्यक्षपद स्वीकारणार असल्याचे जाहीर केलेयथावकाश गेल्या आठवड्यात उस्मानाबादला साहित्य संमेलन पार पडले



संमेलनाच्या दोन दिवसांपूर्वी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे उस्मानाबादनगरीत आगमन झालेतत्पूर्वीच काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुन्हा निषेधाचे अस्त्र बाहेर काढले होते. "विवेक'सारख्या मासिकांनी तर ऐन संमेलनाच्या उद्घाटनापूर्वीच फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मराठी साहित्यात योगदान कितीते खिस्ती धर्मगुरु असल्यामुळे मराठी साहित्य-संस्कृतीवर ख्रिस्ती साहित्याचे अतिक्रमण होतेय काअसे सवाल उभे करणारा अंक प्रकाशित केलाऐन उद्घाटन कार्यक्रमात त्याचे वाटप करण्यात येणार होतेमात्र आयोजकांना त्याची कुणकुण लागताच पोलिसांकरवी संबंधितांची चौकशी करण्यात आलीत्यातून संबंधितांनी संमेलनस्थळी गोंधळ घातला

साहित्य संमेलनामध्ये अशा क्षुल्लक विषयांवरून गोंधळ का घातला जातोहा अनेक रसिकांचा सवाल आहेदरवर्षी संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजेबेळगाव-कारवार मिळून संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेअशा घोषणा दिल्या जातातपोलिस घोषणा देणाऱ्यांना पकडून नेतातयातून काय साध्य होतेआपल्यासारख्या सर्वसामान्य साहित्यरसिकांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.. असे मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलेवर्षांतून एकदा होणारे हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाला राज्यभरातून रसिक येत असतातत्यांना येथे येऊन वैचारिक भूक भागवायची असतेमग त्यांना तुम्ही दर्जेदार साहित्य मेजवानी द्यायची सोडून वादाचे प्रसंग अनुभवायला का देताअसाही सवाल स्थानिकांनी उपस्थित केलायंदाच्या साहित्य संमेलनातील एक विषय खूपच मजेशीर होता.. तो म्हणजे "आजचे भरमसाठ कविता लेखन  बाळसं की सूज'. माजी संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या परिसंवादात व्यक्त केलेले मुद्दे एकीकडे आणि दुसरीकडे संमेलनस्थळी तीन दिवस अव्याहतपणे सुरु असलेला कविकट्टात्याशिवाय निमंत्रितांचा कविकट्टा सुरु होता तो वेगळाचआजच्या भरमसाठ कविता लेखनाचे प्रतिबिंब या कविकट्ट्यावर सादर झालेल्या कवितांमधून दिसत होतेतीन दिवसांत तब्बल दोन हजारांहून अधित नवोदित कवींनी कविकट्ट्यांवर आपल्या कविता सादर केल्यात्यातही अनेक कवितांची मांडणी ही यमक जुळवून केल्याचे जाणवत होतेफारच कमी कवितांमध्ये खोली होतीउंची होतीएकापाठोपाठ एक रटाळ कवितांमुळे उपस्थितांमध्ये चुळबुळ वाढत होतीअधिक खोलात चौकशी केल्यावर कळले कीअनेक नवोदित कवी केवळ साहित्य संमेलनाचे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हासाठीच कविकट्ट्यांत सहभागी झाले होते
ग्रंथप्रदर्शन हा साहित्य संमलेनाचा महत्वाचा भागग्रामीण भागात साहित्य संमेलन होत असल्याने पुरेशी साहित्यविक्री होईल की नाहीअशी शंका प्रकाशकांना होतीमात्रयंदाच्या साहित्य संमेलनाने प्रकाशकांची ही शंका चुकीची ठरवलीगेल्या वर्षी यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमेलनापेक्षा उस्मानाबादच्या संमेलनात साहित्यविक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचे अनेक प्रकाशकांनी सांगितलेतीन दिवस झालेल्या ग्रंथविक्रीतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलीकी पानिपतययातीमृत्युंजयसंभाजीश्रीमान योगी आदी पुस्तकांना अद्यापही मागणी आहेनुकत्याच प्रदर्शित झालेल्या पानिपत चित्रपटामुळे पानिपत पुस्तकाला मागणी वाढल्याचे निदर्शनास आलेहे असे का होतेयावर साहित्यिकांनीअभ्यासकांनी विचार करायला हवा



उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथमच साहित्य संमेलन होत असल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना सहलीला आणावेतसे संमेलनस्थळी आणण्यात आले होतेअनेक विद्यार्थ्यांना तुम्ही इथे कशासाठी आलातहे विचारल्यावर पुस्तकांचे प्रदर्शन पाहायला आल्याचे सांगितलेतुम्ही कोणकोणती पुस्तके घेतलीकोणती पुस्तके वाचायला आवडतातहे विचारल्यावर मात्र ते निरुत्तर झालीतअनेक शिक्षक केवळ पुस्तके बघाहात लावू नकापुस्तके महाग आहेतअसे सांगण्यात धन्यता मानत होतेपुस्तके विकत घेऊन देण्यासाठी कोणताही शिक्षक पुढाकार घेत नसल्याने पुढील पिढीकडे साहित्य संस्कृती किंवा वाचन संस्कृती कशी नेणार याबाबत चिंता व्यक्त केली जात होती

साहित्य संमेलन ही मराठी साहित्यविश्वातला एक कौतुक सोहळाउत्सवसणदरवर्षी मराठी साहित्याचा होणारा हा जागर अधिक विस्तारण्यासाठी आणि येणारे साहित्य संमेलन राजकारणविरहीत आणि वादविरहित होण्यासाठी साहित्य महामंडळआयोजकसाहित्यिक आणि साहित्यरसिकांनी एकामेकांच्या सहकार्यांने काम करण्याची गरज अनेक साहित्य रसिक व्यक्त करीत होतेत्यातील एकाचा साधाभोळा सवाल होता - वादेविना जायते साहित्यबोधअसे होऊच शकत नाहीत का?

शांत आणि शिस्तप्रिय उद्धव ठाकरे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठी वैचारिक परंपरा लाभली. घरातील चळव...